शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )

मी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू

विषाणू



ही कविता राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनासाठी , श्री बबलू वडार
(
शिक्षक -कोल्हापूर) यांनी लिहिली होती. कविता पठण स्पर्धेत त्यांना
पहिला नंबर मिळाला
.

out dated झालंय आयुष्य
स्वप्नही
 download होत नाही
संवेदनांना
 'virus' लागलाय
दु
:खं send करता येत नाही

जुने पावसाळे उडून गेलेत

delete 
झालेल्या file सारखे
अन घर आता शांत असतं

range 
नसलेया mobile सारखे

hang 
झालेय PC सारखी
मातीची स्थिती वाईट

जाती माती जोडणारी

कुठेच नाही
 website

एकविसाव्या शतकातली

पीढी भलतीच
 'cute'
contact list 
वाढत गेली
संवाद झाले
 mute

computer 
च्या chip सारखा
माणूस मनानं खुजा झालाय

अन
 'mother' नावाचा board,
त्याच्या आयुष्यातून वजा झालाय


floppy Disk Drive 
मध्ये
आता संस्कारांनाच जागा नाही

अन फाटली मनं सांधणारा

internet 
वर धागा नाही

विज्ञानाच्या गुलामगिरीत

केवढी मोठी चूक

रक्ताच्या नात्यांनाही

आता लागते 
facebook................

देशाला एक गांधी पुरेसे होते


alt
लोकशाहीत अण्णांच्या मार्गाचे महत्त्व आहेच. लोकांच्या रागाला आवाज देण्याचे व सरकारला धक्के देण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले. सरकारला वेळोवेळी जाब विचारणारा कोणीतरी लागतोच. पण त्या व्यक्तीच्या मागे जाऊन सर्वचजण जाब विचारू लागले तर राष्ट्राची निर्मिती थांबते. जाब विचारणारा एकजण पुरतो, नवनिर्मिती करणारे शंभरजण लागतात. देशाला एक गांधी पुरेसे होते, शंभर सरदार पटेल हवे होते. दुर्दैवाने देशात एकच सरदार जन्मले व शंभर गावगांधी जाब विचारू लागले. ‘एव्हरीबडी वॉन्ट्स टू कंट्रोल थिंग्ज.. नोबडी वॉन्ट्स टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी’ हे श्रीधरन यांचे निरीक्षण देशाची सद्यस्थिती दाखविते. देशाला एक अण्णा पुरेसे आहेत, तर अनेक श्रीधरन हवे आहेत. 


एका विकतच्या श्राद्धाची पन्नाशी






तर हा नेता, तिबेट मधून निघाला! वंश,संस्कृती या दृष्टीने तिबेटच्या दक्षिणेस निघून जाणं या नेत्याला स्वाभाविक होतं थायलंड, व्हिएतनाम, कंबोडीया किंवा पूर्वेकडचा कोरिया, जपान या सारखी कितीतरी पितवर्णीय चपट्या नाकांची बौद्धधर्मीय राष्ट्रे याच्या समोर होती पण, यानं त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. अगदी ब्रम्हदेश (म्यानमार), नेपाळ यांचाही मार्ग त्यानं अनुसरला नाही. कारण एरवी सामान्य अवाका असलेल्या या नेत्याकडे एक व्यावहारिक शहाणपण होतं, त्याला हे चांगलच माहित होतं की वरील राष्ट्रे त्याच्यासाठी कितीही सोयीची असली तरी चीनसारख्या बलाढ्य देशाशी, याच्यासारख्या य:कश्चित नेत्यासाठी आणि त्याच्या निरर्थक शक्ति-युक्ति-बुद्धी विरहित चळवळीसाठी कोणीही शत्रुत्व ओढवून घेण्याचा मुर्खपणा, बावळटपणा करणार नाही. अशी अनाठायी उठाठेव करून स्वत:चं राजकिय मरण ओढवून घेण्याचा मुर्खपणा केवळ भारतातच होऊ शकतो, हे हेरून या नेत्याची चाल भारताकडे सुरू झाली. त्याच्या रुपानं फार मोठं दुर्दैव आपल्याकडे चालून आलं. त्या नेत्याचं नांव दलाई लामा हे तुमच्या लक्षात आलंच असेल.

प्रा. चारुचंद्र उपासनी.
friendsofne@gmail.com       

ईशान्य वार्ता या मासिक अंकाची वार्षिक वर्गणी फक्त रुपये १५० असून त्यासाठीही friendsofne@gmail.com या मेल आयडीवर आपण जरूर संपर्क साधावा. 

Related Posts with Thumbnails

कागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन

Followers

My Blog List

१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या

मराठी ब्लॉग विश्व