शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )

मी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू

खराच लंडनाक चल्ले !

"वस्त्रहरण नाटक घेवन आमी बुवा लंडनाक चल्लव" असं जेव्हा मच्छिंद्र कांबळीने जाहीर केलं तेव्हा मालवणी मुलखातून मालवणी स्टाईलने प्रतिक्रिया उमटली ती अशी...

'फटकेक खाव – ह्येंका एस्टी आणि बोटीच्या उताराक पैसे गावनत नाय, म्हणान तीन-तीन वर्सा गावाचा त्वांड बगनत नाय, ते मायझये लंडनला कसे काय जातले ?'

परंतु अनाऊन्स केल्याप्रमाणे ठरल्या दिवशी, ठरल्या वेळी, ठरल्या तारखेला म्हणजे १३ ऑक्टोबर १९८४ रोजी रात्री ठीक १० वाजता 'भद्रकाली प्रॉडक्शनच्या मुंबईच्या सहार एअरपोर्टवर २२ खलाशांना ( कलावंतांना) नेण्यासाठी दादर टीटीला छबिना (बस) तयार होती. अर्थात या छबिन्याचा नाखवा होता पांडुतात्या सरपंच मच्छिंद्र कांबळी !

व्हाया  वस्त्रहरण

लेखकः गंगाराम गवाणकर

डिंपल पब्लिकेशन


भारतातले पॅलेस्टाइन

इझराएलच्या निर्मितीच्या काळापासून पॅलेस्टाइनमध्ये निर्वासित म्हणून आलेल्या गरीब बिचार्‍या अरबांच्या छावण्या आहेत, आज सुमारे साठ वर्षे ते निर्वासित छावण्यामध्येच रहात आहेत, किती भयंकर ! पण ह्या अरबांबद्दल, त्यांच्या वाईट परिस्थितीबद्दल पाश्चात्य जगतातच नव्हे तर भारतातही खूप बोललं जातं, लिहिलं जातं (ते योग्याच आहे), पण खुद्द आपल्याच देशात पूर्व बंगाल मधून आलेले अनेक हिन्दु आणि बौध्द अजूनही , म्हणजे पॅलेस्टाइन अरब रहात आहेत तेवढ्याच काळापासून निर्वासित छावण्यात रहात आहेत. त्यांची स्थिती अरबांसारखी , किंबहुना त्याहून वाईट आहे ह्या बद्दल आमच्या माध्यमांमधून कधी एखादी बोटभर बातमीही येत नाही, असं का? वर्षानुवर्षे छावण्यात रहाणाचा त्रास अरबांनाच होतो, हिन्दुंना आणि बौध्दांना होत नाही असं काही आहे का? परदुःख शीतल असं म्हणतात, पण इथे तर उलटाच प्रकार दिसतो.

पूर्वांचल

लेखक : अविनाश  बिनीवाले

कॉन्टिनेन्टल  प्रकाशन

परशुरामाचा शाप

परशुरामाचा शाप इतका जबरदस्त होता की आजही तो पुर्वांचलातल्या आम्रवृक्षांना भोवतो आहे.पुर्वांचलात आंब्यांची झाडं खूप आहेत जुनी झाडं तर आहेतच पण अजुनही अनेक हौशी लोक भारतातल्या इतर भागातून कुठून-कुठून वेगवेगळ्या जातींची रोपं आणून्ही लावतात, जोपासतात. इथल्या आम्रवृक्षांना दर वर्षी नित्यनेमाने मोहोर येतो, आंबेही लागतात, पण इथला प्रत्येक आंबा झाडावर असतानाच सडायला लागतो. एकही आंबा खाण्याच्या लायकीचा नसतो! कैरीचा आंबा होताना त्यात असंख्य किडे होऊन तो नासतोच.

पूर्वांचल

लेखक : अविनाश  बिनीवाले

कॉन्टिनेन्टल  प्रकाशन

Related Posts with Thumbnails

कागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन

Followers

My Blog List

१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या

मराठी ब्लॉग विश्व