शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )

मी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू

नेहरूसरकारचं पाकिस्तानप्रेम

त्रिपुरा हे राज्य उत्तर, पश्चिम, दक्षिण अश्या तीनही दिशांनी बाङ्ला देशानं वेढलेला आहे आणि आगरतला हे राजधानीचं शहर (१९४७ च्या फाळणीमुळे ) अक्षरशः सीमेवर येऊन पडलं ! फाळणीच्या पूर्वी शिलचर-करीम्गंज-सिल्हेट-अगरतला असा लोहमार्ग होता, त्यावरून आगगाड्या धावत होत्या, पण नेहरूसरकारच्या पाकिस्तानप्रेमामुळे आपल्याला मिळालेला सिल्हेट हा भारतातला ( असम राज्याचा ) एक मोठा जिल्हाच आपण पूर्व-पाकिस्तानला सप्रेम भेट म्हणून देऊन टाकला! ह्या औदार्यामुळे आपला बाङ्ला-असमला जोडणारा सिलिगुडीमार्गे जाणारा एकमेव मार्ग वगळता बंगाल-असम, बंगाल-त्रिपुरा, बंगाल-काचार असे बाकीचे सारे लोहमार्ग पूर्व-पाकिस्तानात गेले नि परिणामतः फाळणीनन्तर बराच काळ आगरतल्याला जाणं हे आपल्याला अशक्यच झालं होतं नि दुर्दैवाने ते अजुनही बरंच अवघड आहे !!!

पूर्वांचल

लेखक : अविनाश  बिनीवाले

कॉन्टिनेन्टल  प्रकाशन

0 comments:

Post a Comment

Related Posts with Thumbnails

कागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन

Followers

My Blog List

१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या

मराठी ब्लॉग विश्व